जीवन कसे जगावे

 


आयुष्य हसतमुखाने जगा ...

(लक्ष्मण ठाकरे)


जीवनाशी अभिमुख होऊन जगण्याचे तत्त्व एकदा त्याला पटल्यावर जगता जगता जी संकटेदुःखाचे वा सुखाचेआनंदाचे क्षण येतील त्या सर्वांकडे साक्षेप बाळगून म्हणजे त्यास तोंड देऊन वा उपभोगून तो आपले जीवन संपूर्णपणे यशस्वी व समाधानी करू शकतो. सुखी जीवन जगण्यासाठी संतांनी वा विचारवंतांनी जीवनाच्या यशस्वीतेसाठी जो मार्ग दाखविला आहेत्यात कर्ममार्गज्ञानमार्ग व उपासनामार्ग या तिन्हींचा सम्यक विचार करणे व त्याचा अवलंब करणे त्यास क्रमप्राप्त आहे. अशा प्रकारे जगणारा त्याचा स्वतःचाही व जगाचाही किंवा निदान त्याच्या कुटुंबाचा वा समाजाचा फायदा करून घेईल. जगता जगताच म्हणजे जगण्याचा आनंद उपभोगत असताना माणसाने अशा निर्णयास यावे कीआता आपण खूप जगलोमनसोक्त जगलोजगावयाचे व मिळवावयाचे असे काही शिल्लक राहिलेले नाही.
तुमचा रुटीन किंवा दिनक्रम काय
असा प्रश्न मी आपणांस विचारल्यासआपले उत्तर काय असेलसकाळी उठून आवरणेनोकरीवर जाणेरोजचे काम जमेल तितक्या आवडीने करणेघरी येऊन परिवारासोबत वेळ घालविणेमनोरंजनासाठी टी.व्ही. बघणे आणि जेवण वगैरे उरकून झोपी जाणे. आपण गृहिणी असालतर यात स्वैपाक करणेमुलांची काळजी घेणेत्यांचा होमवर्क वगैरे करून घेणेया जबाबदाऱ्यासुद्धा आल्या. हे चक्र रोज त्याच गतीने फिरत असते. जवळजवळ त्याच वेळेलारोज त्याच गोष्ट घडत असतात. अगदी रविवारचे रुटीनसुद्धा तेच-तेच झालेले असते – उशिरा उठणेमनसोक्त टी.व्ही. बघणेपिक्चर बघायला जाणे आणि बाहेर खाणे.

आयुष्याला शिस्त असणे, एक व्यवस्थित ढाचा असणे, ही खरेतर चांगली गोष्ट आहे, नाही का? पण मग आपण आपल्या जीवनात आनंदी का नसतो? ‘कंटाळा आला तेच तेच करून’; ‘हरवल्यासारखं झालंय’; ‘बोअर झालंय’….अशी वाक्ये सारखी का ऐकू येतात? आपले काम, आपला परिवार, सगळेच आपल्याला आवडत असते. मग हे आपल्या मनासारखे जीवन आपल्याभोवती उभे करूनही, काय निसटते आहे? काय राहून जाते आहे? सारखे आपल्या स्मार्टफोन्समध्ये आपण नेमके काय शोधत असतोजीवन खरोखर आनंदी कशाने होते?

याचे उत्तर खरेतर इतके सोपे नाही. कारण आनंद ही अशी एक भावना नाही. पतंग उडविताना जो आनंद मिळतो, तो प्रमोशन मिळाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षा वेगळा; पहिल्या पावसात भिजण्याची मजा, ही पहिली कार घेतल्यावर होणाऱ्या हर्षापेक्षा निराळी. आपला पिंड कायआपल्याला काय आवडते, यानुसार आपला आनंद कशात आहे, हे ठरत जाते. पण या सगळ्यामध्ये एक घटक सातत्याने असावा लागतो

आनंदाचा ध्यास आणि तो मिळविण्याची



तसे पाहता, आनंद हेच सर्वसाधारण माणसाच्या जीवनाचे उद्दिष्ट असते. पण त्यासाठी तो अनेक ताणतणावांतून जात असतो. याचे कारण आपला आनंद हा भौतिक गोष्टींशी जोडला गेला आहे. म्हणजेच, पर्यायाने तो पैसे कमविण्याशी जोडला गेला आहे. तो कमविण्यासाठी मग ऑफिसात वेळेवर पोचायला हवे; त्यासाठी वेळेवर लोकल गाठली पाहिजे; ट्रॅफिकचा, हॉर्न्सचा गोंगाट ऐकला पाहिजे; बॉसची बोलणी ऐकायला हवी; प्रमोशन मिळवत राहायला हवे; कार विकत घ्यायला हवी आणि सरतेशेवटी पॉलिसी काढून, पुढच्या पिढीचीही सोय करायला हवी. या छोट्या-छोट्या गोष्टी जोडत जाताना, आयुष्याविषयीचा मोठा दृष्टीकोन हरवत जातो. जगणे संकुचित होत जाते. स्वयंस्फूर्ती वगैरे
बद्दल तर मग बोलायलाच नको.

रोज एक तास व्यायाम’, ‘एक तास लिखाण’, ‘अर्धा तास वाचनअसे अनेक निर्धार आपण नववर्षाच्या सुरुवातीला करतो. जानेवारीच्या साधारण दुसऱ्या आठवड्यापर्यंत ते कोलमडतात. पुन्हा त्याच चक्रामध्ये आयुष्य फिरू लागते. पण आपले किती निर्धार खरोखर मनापासून केलेले असतात? एखादी गोष्ट मनापसून आवड असते, म्हणून ती आपण करतो का? आपल्याला मनापासून खरंच काय आवडते, हे आपल्याला माहिती आहे का? तेच माहित नसल्यास, आपल्याला आनंद कुठून मिळतो, त्याचा नेमका (आपल्यासाठीचा) स्त्रोत कुठला, हेच आपल्याला कळणार नाही.

यातूनच आपण दुसऱ्या मुद्द्यकडे वळतो. स्वयंस्फूर्तीच्या शोधासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट आत्मसंवाद.

आपण कोण आहोत? आपला स्वभाव नेमका कसा आहे? आपल्यात कुठली कौशल्ये आहेत? आपली बलस्थाने कुठली? आपल्यात दोष कुठले आहेत? हे प्रश्न केवळ नोकरीच्या इंटरव्यूपुरते महत्त्वाचे नसतात. ते आपल्या रोजच्या आयुष्याला दिशा देणारे, त्याला काहीएक उद्दिष्ट देणारे आहेत. स्वतःचा शोध आपण जितका घेत जातो, त्यानुसार जितके स्वतःत बदल घडवितो, तितके आपले आयुष्य अधिक समृद्ध, अधिक अर्थपूर्ण होत जाते. त्यातूनच मग समाधाननावाची एक निसटती गोष्ट हळूहळू हाती लागू लागते.
पण हे तर तुम्ही अनेक सेल्फ-हेल्प पुस्तकांमध्ये वाचले असेल. प्रश्न असा आहे, की हा आतला आवाज इतक्या सहजासहजी सापडतो का? आधी म्हंटल्याप्रमाणे, आजूबाजूच्या गदारोळामध्ये, गोंगाटामध्ये आपण सतत ओढले जात असतो. यातला बराच भाग ऐच्छिकही असतो रिअॅलिटी शोज, अर्थहीन सिनेमे, कानातल्या हेडफोन्सवर वाजणारी रॅप वगैरे गाणीहे सगळे आपणच आपल्यासाठी निवडतो. या सगळ्यात जागा कुठे आहे नवीन विचार डोक्यात शिरायला, स्वतःबद्दल काही प्रश्न पडायला, उत्तरांचा शोध घ्यायलाआपल्या आतला आवाज मग दबतच जातोत्याला वाटच मिळत नाही.

मग आतला आवाज कायमचा मरतो का?

अजिबातच नाही. मानवी मेंदू, त्याचे मन, हे विचार करण्यासाठीच बनलेले आहे. ते कार्य ते सतत करतच असते. कुठल्या न कुठल्या दिशेने ते विचार करतच असते. आनंदी असण्यासाठी मात्र, गरज असते ती या विचारांना योग्य दिशा देण्याची. आणि ही दिशा मिळते, ती

एक साधे तत्त्व, खरेतर एक सामान्य निरीक्षण, मला नेहमीच पटते आपला शोध हा आपल्याला दुसऱ्यांच्या माध्यमातून लागतो. आई जेव्हा कौतुकाने म्हणते, ‘हा फारच आळशी आहे’, तेव्हा आपल्याला उमजते, की खरंच आपल्यात आळस भरत चाललाय. वडील जेव्हा कोणालातरी सांगतात, की हिच्यात व्यवस्थापनाचं कौशल्य आहे’, तेव्हा आपल्यालाही वाटते, खरंच, माझ्यात हा गुण आहे! आनंद कुणाशीतरी शेअर करणेदुःखं कोणालातरी सांगणे, हा अगदी मुलभूत मानवी स्वभाव आहे. त्यात तात्त्विक वगैरे असे काहीच नाही. एका अर्थाने हा आत्मसंवादच आहे.
ज्यातून आपल्याच मनातील अव्यक्त व्यक्त होत जाते, निराकार आकार घेत जाते, आणि आपण स्वतःला आणखी चांगले ओळखू लागतो. पण परस्पर संवाद वाटतो तितका सोपा नाही राहिलेला. मोबाईल, इंटरनेट मुळे जग खरोखरच जवळ आले आहे. त्याची गरज आणि त्याचे महत्त्व नाकारता कामा नये. आपण त्यामुळे सतत एकमेकांच्या संपर्कात असतो. व्हॉट्स अॅपवर ग्रुप बनवून एकमेकांशी बोलत असतो. त्यातून विनोद शेअर करून आपण हसतो, गंभीर चर्चाही करतो. त्यातून मिळणारा आनंद किंवा समाधान हे तात्पुरते असेल, पण ते खोटे आहे, असे नाही.

पण म्हणून आपली एकमेकांना भेटण्याची आसक्ती कमी होते का? एखाद्या निवांत दुपारी मित्रांबरोबर बसून पिझ्झा खाण्याची गंमतच निराळी! घरी जाऊन आईला एवढ्या-तेवढ्या कामांमध्ये मदत करत, तिच्याशी गप्पा मारण्यातून मिळणारा आनंद कितीतरी मोठा! याचाच अर्थ असा, की अजून तरी, आपण पूर्णपणे आभासी जगात जगायला सुरुवात नाही केलेली. प्रत्यक्ष भेटीची, संवादाची उर्मी, त्यातून मिळणारी उर्जा, यांची आपल्याला अजूनही हाव आहे.

मग गाडी कुठे अडते? पुन्हा तेच धकाधकीचे जीवन, सगळ्यांच्या आपापल्या प्राथमिकता, भौतिक (आणि भावनिकही) अंतरआणि प्रत्यक्ष भेटल्यावरही आपण सतत विचलित असतोच. मोबाईलमध्ये म्हणा, ऑफिसातल्या एखाद्या कामाच्या विचारामध्ये म्हणा, आपले मन, आपले लक्ष, दुभाजित असते. हे इतके वाढले आहे, की युरोपातल्या एका कॅफेने त्यांच्या दारासमोर असा बोर्ड लावला आहे – ‘आम्ही फ्री वायफाय देत नाही. आम्हला अपेक्षित आहे की तुम्ही तुमचे फोन बाजूला ठेवावेत, एकमेकांशी बोलावे, एकमेकांचे ऐकावे.खरंच, कोणाचेतरी लांबलचक किस्से मनापासून ऐकणे, त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देणे, गप्पा मारणे, हे आपण शेवटचे कधी केले होते? आपल्याला ही कोणीतरी ऐकणारा
हवाच असतो ना !

पण हे नाहीच जमत! आणि यात आपला किंवा समोरच्याचा दोष नाही. आधुनिक जीवनाच्या गरजा, त्याची गती इतकी आहे, की एका छाताखाली राहूनही, आपल्याला एकमेकांशी बोलायला, एखादी संध्याकाळ राखीव ठेवून, हॉटेलात जावं लागतं (फ्री वायफाय न देणाऱ्या!). परिणामी, विसंवाद वाढत जातो. किंवा संवाद गायबच होत जातो. एक घुसमट तयार होत जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपला आतला आवाजही दबत जातो.

 प्रोफेशनलदृष्ट्या करणे, म्हणजे केवळ पैसे घेऊन करणे, इतकेच नव्हे. समुपदेशक त्याचे शैक्षणिक आणि व्यावसायिक ज्ञान, त्याची बुद्धिमत्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अनेक शास्त्रशुद्ध प्रक्रिया अवलंबून, तुमच्याशी संवाद साधत असतो. वरवर या संवादाचे स्वरूप गप्पांसारखेच असते. खोलवर मात्र, तो काही विशिष्ट माहिती मिळवत, विशिष्ट आराखडे आखत, तुमच्या नेमक्या समस्येपर्यंत पोहोचतो आणि तिच्यावर ठोस असे उपाय करतो. हे करताना तो ज्या प्रक्रिया वापरतो, त्या विविध प्रकारच्या असू शकतात. प्रत्येक प्रक्रियेचे, ज्ञानशाखेचे विशिष्ट असे महत्त्व आहे.
यातीलच एक महत्त्वाची, प्राचीन आणि अत्यंत परिणामकारक ठरलेली ज्ञानशाखा म्हणजे संमोहनशास्त्र ! संमोहनहा शब्द ऐकल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल, याची मला, एक संमोहनतज्ज्ञ म्हणून, आता बरीच कल्पना आहे. गेली १४ वर्षे हे काम करताना, मी जिथे जिथे जातो, तिथे लोकांचे अनेक प्रश्न, अनेक गैरसमज, दूर करण्यात मला बराच वेळ द्यावा लागतो. त्यात मला आनंदही मिळतो, कारण संमोहनाचा त्याच्या मूळ स्वरूपात व्यापक प्रचार करणे, हा माझ्या कामाचा एक मोठा भाग आहे. संमोहन हा जादूटोण्याचा प्रकार आहे, असे अनेकांना वाटते. संमोहनतज्ज्ञ तुमच्या डोळ्यांत डोळे घालून, तुमच्यासमोर जादुई लंबक हलवून आणि मग एक चुटकी वाजवून, तुम्हाला संमोहित करतो आणि मग वाट्टेल ते करायला लावतो, असा एक मोठा गैरसमज पसरलेला आहे.

टी.व्ही. किंवा इतर माध्यमांतून, जे मनोरंजनासाठीचे कार्यक्रम दाखविले जातात, त्यातून हा समज अधिक दृढ होत गेला आहे. यात संमोहित व्यक्तींना त्यांचे कपडे काढायला लावणे, विकृत चाळे करायला लावणे, चोऱ्या करायला लावणे, असे विविध प्रकार दिसतात. मूळतः त्यांची टर उडवून, त्यातून विनोदनिर्मिती करण्याचा हा प्रयत्न असतो.

विद्यार्थी, महिला, पोलीस, खेळाडू अशा विविध गटांनात्यांच्या विशिष्ट समस्येनुसार नेमकी मदत यातून करता येते. हे उपचार तुम्हाला दीर्घकाळ परिणाम दाखविणारे आणि महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला आत्मनिर्भर करणारे असतात. कुठल्याही लंबकाचीकुठल्याही जादूची यात गरज नसते. कारण खरी जादू, ही तुमच्या अंतर्मनात असते, त्याच्यात असलेल्या अगाध शक्तीमध्ये असते. या अंतर्मनाशी तुमचा संवाद सुरळीतपणे सुरु झाला, की आनंद, हास्य, समाधान, या तितक्याशा अवघड गोष्टी राहत नाहीत.

आयुष्य सुंदर आहे’, ‘आनंद आपल्या अवतीभोवतीच असतो’, अशी वाक्ये आपण अनेकदा ऐकतो. पण आनंद खरेतर आपल्या मध्येच आहे. त्याला वाट करून देणे, त्याला दिशा देणे, हे आपले काम आहे. मग रुटीनही मजेदार वाटू शकतो आणि रोजचे आयुष्य आनंददायी होऊ शकते. गरज आहे, ती स्वयंस्फूर्ती शोधण्याची, आपला आतला आवाज शोधण्याची, परस्पर-संवाद साधण्याची. आनंदाच्या रेसिपीचे हे सगळे घटक आहेत. संमोहन केवळ एक माध्यम, एक धग आहे, जी या सगळ्या घटकांना एकजीव करते.


थोडे नवीन जरा जुने